नितेश राणे यांनी कोकणामध्ये वेगेवेगळ्या भागातून गुंड आणून ठेवले. माझ्या जिवाला त्यांच्यापासून धोका आहे, अशी तक्रार शिवसेनेचे कणकवलीचे उमेदवार सतिश सावंत यांनी पोलिसांकडे केली आहे. अशी माहिती सावंतांनी माध्यमांशी बोलताना दिली.
नितेश राणे यांनी मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर व इतर भागातील गुंड कोकणात विविध भागात आणून ठेवले आहेत. त्यांच्यापासून माझ्या जिवाला धोका आहे. माझ्यावर हल्ला होऊ शकतो. मला पोलीस संरक्षण हवे आहेत असे सावंतांनी तक्रारीत म्हटले आहे. अशी माहिती सावंतांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.
कणकवली मतदारसंघात भाजपचे नितेश राणे विरुध्द शिवसेनेचे सतिश सावंत अशी लढत होत आहेत. शिवसेना,भाजपा युती असूनही शिवसेनेने येथे भाजपा विरोधात बंड पुकारून राणेच्या पराभवासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. यामुळे येथील सामना चांगलाच रंगला आहे.