आज विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान झाले. यासाठी 3,237 उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांचे भवितव्य ईव्हिएममध्ये बंद झाले. 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार असून, भवितव्याचा फैसला लागणार आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या लोकशाहीचा उत्सव पार पडला. राज्यातील 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदार आहेत. यासाठी 3,237 उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हिएममध्ये बंद झाले. मतदारांमध्ये काही ठिकाणी उत्साह तर कुठे निरुत्साह दिसून आला. सकाळपासून कुठे ढगाळ तर कुठे उन होतं. सेलेब्रेटींनी, उमेदवारांनी मतदान करण्याचे आवाहन केले तरी सुध्दा मतदारांनी योग्य तो प्रतिसाद दिला नसल्याचे चित्र आहे.