अकोला : अवकाळी पावसाचा महाराष्ट्रातील पिकांना फटका बसला आहे. त्याची पाहणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला जिल्ह्यात केली. बुधवार 6 नोव्हेंबरपर्यंत 100 टक्के पिकांचे पंचनामे पूर्ण करु. सरकार शेतक-यांच्या मदतीसाठी सज्ज आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.
आज देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील अकोला जिल्ह्यात नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. यावेळी फडणवीसांनी सांगितले की, सरकारी पंचनाम्याच्या आधारावर नुकसानग्रस्त शेतक-यांना मदत दिली जाईल. कुणीही मदतीपासून वंचित राहणार नाही. सगळ्यांनाच मदत मिळेल. शेतक-यांना विम्याचा फायदा मिळणार आहे. विम्याच्या पावतीचा आग्रह धरु नका. असेही फडणवीस यांनी सांगितले.