अमरावती : शिवसेना भाजपा सत्तासंघर्षाचा पेच कायम आहे. मात्र राज्यात शेतक-यांची बिकट अवस्था असल्यामुळे शरद पवारांसारख्या उमद्या नेत्याच्या हातात राज्याची सत्ता द्या. अशी मागणी महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आमदार यशोमती ठाकूर यांनी केली.
मुख्यमंत्री आज दिल्लीत सत्तासंघर्षावरून दिल्लीत आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेचं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना काँग्रेस आमदार ठाकूर यांच्या मागणीला विशेष महत्व प्राप्त झाले. काँग्रेस नेते वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं सांगत आहे मात्र, युतीमधील वाद थांबत नसल्याचे चित्र आहे.
यशोमती ठाकूर म्हणाल्या, सेना-भाजपने भांडण सोडून शेतकऱ्यांकडे लक्ष द्याव. अन्यथ सरळ शरद पवारांना मुख्यमंत्री बनवा आम्ही काँग्रेसवाले त्यांच्यासोबत जाऊ. शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई तातडीने द्या अशी मागणी ठाकूर यांनी केली.