पुणे : ’विनाकपात एकरकमी एफआरपीच्या’ मागणीसाठी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेने विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला. संपूर्ण राज्यातून सुमारे हजार शेतकरी मोर्च्यात उपस्थित होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज सोमवारी साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला .पुण्यातील अलका टॉकीज चौकापासून सुरु झालेल्या या मोर्च्यात जोरदार घोषणाबाजी करत संतप्त आंदोलक शेतकऱ्यांनी कचरा जाळून सरकारचा निषेध व्यक्त केला आहे.
या मोर्च्यासाठी मोठ्या प्रमाणात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.मोर्चामध्ये राजू शेट्टींसोबत योगेंद्र यादव आणि रविकांत तुपरक हे देखील सहभागी झाले.