पुणे : ‘करोना’ प्रादुर्भाव वाढत चालला आहे तरी सुध्दा नागरिक घराबाहेर पडत आहे. सरकारकडून वारंवार सूचना करुही लोक ऐकत नसल्याचे चित्र आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सुशिक्षित लोकच बेजबाबदारपणे वागत आहेत, हे दुर्दैव आहे. भाजीसाठी गर्दी करू नका, अन्यथा भाजीपाला मार्केटही बंद करावं लागेल,’ असा इशाराही त्यांनी दिला आहे.
जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या…
‘करोना’ च्या पार्श्वभूमीवर सरकारनं राज्यात संचारबंदी लागू केली आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात साथीचा प्रसार होऊ नये म्हणून जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. जमावबंदीही लागू करण्यात आली आहे. त्यानंतरही अनेक ठिकाणी लोक गर्दी करताना दिसत आहेत.