सांगली: राज्याच्या मुख्यमंत्रीपदी येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती असेल, एक तरी कॅबिनेटची मिटिंग ही रायगडावर घ्यावी, असा प्रस्ताव कोल्हापूरचे छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी ठेवला आहे.
छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांचा सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभववर माध्यमांशी बोलताना आपलं मत व्यक्त केलं. छत्रपती उदयनराजे यांचा बंधू या नात्याने सांगतो, ‘छत्रपती उदयनराजे यांचा पराजय म्हणजे, तो आमचा पण पराजय आहे, मनापासून आम्हाला दुःख वाटतंय.
छत्रपती खासदार संभाजीराजे म्हणाले की, नवीन आमदारांना विनंती, गावाचा विकास करायचा असेल, तर प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना समजून घ्या, त्यासाठी रायगडावर जाऊन नतमस्तक व्हा, फक्त जयजयकार करून चालणार नाही, असं देखील खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी सांगितलं.