सातारा : सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाच्या उदनराजे भोसलेंचा मोठ्या मताधिक्याने दारुण पराभव झाला. याबाबत आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, भाजपाला उदनयराजेंच्या पराभवावर आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे.
साताऱ्यात लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपाच्या उदयनराजे भोसलेंचा पराभव झाला आहे. ९५ हजारहून अधिक मतांनी राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील विजयी झाले आहेत. शिवेंद्रसिंहराजे यांनी उदयनराजेंच्या पराभवावर बोलताना पक्ष म्हणून आत्मपरिक्षण करण्याची भाजपाला गरज आहे असं मत व्यक्त केलं आहे.
विधानसभेच्या सहा मतदारसंघांचा मिळून लोकसभेचा एक मतदारसंघ होतो. आम्ही पक्ष म्हणून आमच्या भागामध्ये काम केलं पण बाकी ठिकाणी काय झालं, मताधिक्य का नाही मिळालं या गोष्टींच पक्ष म्हणून आत्मपरिक्षण, आत्मचिंतन करणं गरजेचं आहे,” असं शिवेंद्रसिंहराजे म्हणाले आहेत.