- बिग बॉस ११ या पर्वामध्ये मराठमोळ्या शिल्पा शिंदेने बाजी मारली. हे पर्व सुरू झाले तेव्हापासूनच हिना खान या पर्वाची प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले जात होते. मात्र, तिच्या वागणुकीमुळे तिला हार मानावी लागली. बिग बॉसमधील तिची सुरुवात चांगली होऊनही पुढच्या काळात ती फारशी चमक दाखवू शकली नाही.
पहिल्या एपिसोडपासूनच घरात तिची नकारात्मक वागणूक पाहायला मिळाली. स्वतः विजेता असल्याच्या अविर्भावात ती वागत होती. हिना खानची फॅन फॉलोविंगही जबरदस्त होती. मात्र, दरम्यानच्या काळात तिची वागणूक इतकी नकारात्मक झालेली पाहायला मिळाली, की त्याचा फायदा शिल्पा शिंदेला झाला.
खोटे बोलणे पडले महागात…
आठवड्याभरात हिना बऱ्याच गोष्टी बोलायची मात्र, सलमान खान समोर बोलण्याची वेळ यायाची तेव्हा तेव्हा हिनाने खोटं बोलण्याचा पवित्रा घेतला. ‘मी असे बोललेच नाही’, असे म्हणणे तिला महागात पडले. त्यामुळे घरात आणि घराच्या बाहेरही तिला नापसंती मिळत गेली.
वाईटाची संगत…
हिनाने खरे बोलणाऱ्याची कधीच साथ दिली नाही. हेही तिच्या पराभवाचे एक कारण म्हणता येईल. तिने अनेकदा घरातील सदस्यांना भडकवण्याचे काम केले.
अपशब्दांचा वापर…
हिनाने शिल्पा शिंदेला जाड म्हटले होते. तसेच, प्रियांक-लव यांच्या मदतीने तिची टिंगलही केली होती. हिनाने अर्शी आणि शिल्पा यांच्याबाबत अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली होती. मात्र, सलमानसमोर कधीही कबुली दिली नाही.
गर्वाचे घर खाली…
हिनाच्या वागण्यातून वारंवार तिच्या गर्वाचे दर्शन घडले. तिने आठ वर्ष सिरियल मधून काम केले असल्याचा दाखला ती वारंवार द्यायची. आत्मकेंद्री वृत्तीच्या हिनाला ते बरेच महागात पडले.
दुसऱ्यांना अपमानजनक वागणूक…
हिनाने सलमान खानपासून घरी आलेल्या अनेकांबद्दल वादग्रस्त विधाने केली होती. साक्षी तन्वरलाही तिने अनेक नावे ठेवली होती. खतरों के खिलाडीमधील तिच्या प्रतिस्पर्ध्यांनाही तिने सोडले नाही. याचा परिणाम म्हणून अनेकांनी तिच्यावर सोशल मीडियातून टीका केली होती.