मुंबई l भारती सिंहच्या घरात अंमली पदार्थ आढळून आल्यानंतर NCB ने तिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. चौकशीत भारतीने अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिल्यानंतर NCB ने तिला ‘एनपीडीएस’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांचा जामिनाचा अर्ज मंजुर झाला. दरम्यान यावर बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतने Rakhi sawant वक्तव्य केले आहे.
View this post on Instagram
सतत चर्चेत असणारी अभिनेत्री राखी सावंत आता पुन्हा एकदा चर्चेत आहे. तिने भारती सिंह ड्रग्ज प्रकरणावर वक्तव्य करत प्रश्न विचारला आहे. बॉलिवूड फोटोग्राफर विरल भयानीने राखी सावंतचा हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
‘सध्या जे काही सुरु आहे, अनेकांच्या घरी अचानक छापा घातला जातो आणि तेथे ड्रग्ज मिळतात याची कोणी टीप देत आहे का? या संदर्भात कोणी फोन करुन माहिती देत आहे का? मला याबाबत काहीही माहिती नाही. मला फक्त इतकच हवं आहे नेहमी फक्त कलाकारच का पकडले जातात? का कोणत्या मंत्र्याचा मुलगा पकडला जात नाही? संपूर्ण देशात ड्रग्ज केवळ कलाकारच घेतात का? दुसरे का पकडले जात नाहीत?’ असे राखी म्हणाली आहे.
वाचा l हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे?; उध्दव ठाकरेंचा राज्यपालांना टोला
पुढे ती म्हणते ‘मला हा फंडा समजतच नाही. सर्वात पहिले भारतीसोबत असे काही होऊ शकते यावर माझा विश्वासच बसत नाही. कारण ती भारतातील सर्वात लोकप्रिय कॉमेडियन आहे, तिचा सर्वजण आदर करतात. मी जेव्हा भारतीला अटक झाल्याची बातमी ऐकली तेव्हा माझा त्यावर विश्वासच बसत नव्हता. कोणी तरी त्यांच्या घरात ड्रग्ज ठेवले आणि फोन केला आहे.’भारती आणि हर्ष माझे चांगले मित्र आहेत. मला असे वाटते हे कोणाचे तरी षडयंत्र आहे.