ठाणे (17) मिसल्स रूबेला लस ही मुलांच्या आरोग्याच्यादृष्टीने अतिशय महत्वाची असून पालकांनीअफवांवर विश्वास न ठेवता आपल्या मुलांच्या आरोग्याचा विचार करावा असे सांगतानाच महापालिकाआयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज कौसा येथील मुस्लीम धर्मगुरू, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी,सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक यांनी याबाबत जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
मिसल्स रूबेला या लसीबाबत मुंब्रा आणि कौसामधील नागरिक आणि पालक यांच्यामध्ये गैरसमज आणिअफवा पसरविल्या जात आहेत या पार्श्वभूमीवर स्थानिक नगरसेवक आणि महापालिकेच्यावतीने कौसायेथील डायमंड हाॅल येथे आज विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, मौलवी, विविध राजकीय पक्षांचेप्रतिनिधी आणि विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची एक बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त(१) राजेंद्र अहिवर, सामाजिक कार्यकर्त्या सौ. ऋता आव्हाड, मौलानारफिक अजमल, मौलाना श्री. अखलक, मौलाना अझरूद्दीन, प्रभाग समिती अध्यक्षा सौ. अनिता किणे,नगरसेवक शानू पठाण, बाबाजी पाटील, मोरेश्वर किणे, राजन किणे नगरसेविका सौ. रूपाली चंदन गोटे, श्रीमती आशरीन इब्राहीम राऊत, श्रीमती फरझाना शाकीर शेख, सामाजिक कार्यकर्ते शमीम खान यांच्यासह मोठ्या प्रमाणात पालक आणि शिक्षक उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापालिका आयुक्त श्री. जयस्वाल यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर या लसीची गुणवत्तासिध्द झालेली असून देशात जवळपास २० कोटी विद्यार्थ्यांना ही लस देण्यात आली आहे. आपले जरआपल्या मुलांवर प्रेम असेल आणि त्यांच्या आरोग्याची काळजी असेल तर या लसीबाबत जे गैरसमजपसरविण्यात आले आहेत, ज्या अफवा उठविण्यात आल्या आहेत त्यावर विश्वास ठेवू नका अशी सर्वांनाविनंती केली.
याबाबत सर्व सामाजिक, राजकीय संस्थांनी मौलांना यांनी पुढाकार घेवून हा गैरसमज दूर करण्यासाठीसहकार्य करण्याचे आवाहनही केले. यावेळी सौ. ऋता आव्हाड यांनी सरकार