अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत घोषणा केली आहे. यामुळे अजित पवार हे विरोधी पक्षनेते होणार आहेत.
जितेंद्र आव्हाड आणि धनंजय मुंडे यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांचं स्वागत केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर अजित पवार यांनी सर्वांचेच आभार मानले. तसेच पहिल्यांदा सरकार स्थापन करणाऱ्यांना दिवाळी गोड खाता आली नसल्याचा टोला लगावला. ते म्हणाले, “आपण आपल्या निवडणुकीतील कामावर खूश आहोत. मात्र, सत्ता स्थापन करण्याचा दावा करणारे मात्र, आनंदी नाहीत.”
सहकारी सोडून गेले नसते तर सरकार आपले सरकार आले असते. जे गेले त्यांना आता पश्चाताप होत आहे. निवडून आलेल्या उमेदवारांचे कौतूक केले. ज्या उमेदवारांचा पराभव झाला त्यांच्याशी भेट घेऊ. आपण कुठे कमी पडलो याबाबत चर्चा करु. पुन्हा जोमाने कामाला लागू असेही अजित पवार म्हणाले. प्रचाराला अजून एक आठवडा मिळाला असता तर आपलं सरकार आलं असतं. असेही अजित पवार म्हणाले.