नवी दिल्ली : भाजपने दिल्ली विधानसभा काबीज करण्यासाठी संपूर्ण भाजपला कामाला लावले. मात्र भाजपचे नेते, पदाधिकारी वादग्रस्त विधान करताना दिसत आहेत. प्रचार सभेत भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर वादग्रस्त घोषणांमुळे अडचणीत सापडले आहेत. याप्रकरणी दिल्लीच्या निवडणूक कार्यालयाने त्यांच्या वादग्रस्त घोषणेची दखल घेत त्या संदर्भात अहवाल मागवला आहे.
BJP’s desperate attempt to polarise delhi elections
@ianuragthakur campaigning in Delhi today. “ देश के ग़द्दारों को , गोली मारो सालों को। “
Will @ECISVEEP take any action for this open call for violence#AnuragThakur pic.twitter.com/Tsu60vpLNw
— All India Mahila Congress (@MahilaCongress) January 27, 2020
‘देश के गद्दारों को..’
दिल्ली विधानसभा हस्तगत करण्यासाठी आप, भाजपा व काँग्रेस या तीन पक्षात मुख्य जोरदार लढत होणार आहे. तिन्ही पक्षांनी दिल्लीची सत्ता मिळवण्यासाठी प्रचारात झोकून दिल्याचं चित्र सध्या आहे. भाजपाचे उमेदवार मनीष चौधरी यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी वादग्रस्त घोषणा दिली होती.
रिठला विधानसभा क्षेत्रात झालेल्या या सभेत भाषण करताना अनुराग ठाकूर यांनी ‘देश के गद्दारों को..’ घोषणा केली. त्यानंतर सभेला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी ‘गोली मारो… को’ अशी घोषणाबाजी केली होती. रिठाला विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार मनीष चौधरी यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही उपस्थिती होती.
या प्रकरणी भाजप आणि अनुराग ठाकूरांवर जोरदार टीका झाली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने गांभीर्याने दखल घेतली आहे. यामुळे भविष्यात ठाकूरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.