मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे वाहत असताना आता कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची चिन्हे आहेत. राज्यात १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान निवडणुका होतील, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
भाजपाची कोअर कमिटीची बैठक मुंबईत सोमवारी पार पडली. सुमारे सात चाललेल्या बैठकीत आगामी निवडणुकीविषयी चर्चा करण्यात आली. भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यातील नेत्यांनी या बैठकीला हजेरी लावली होती.
या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “राज्यात विधानसभेची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते. राज्यात १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान निवडणुका होतील”, अशी माहिती त्यांनी दिली.