मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांब पल्याच्या तसेच लोकल रेल्वे सेवा 14 एप्रिलपर्यत बंद राहणार आहेत. सध्या देशभर लॉकडाऊन सुरु असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
सध्या कोरोनाचा थैमान सुरुच असून त्याला रोखण्यासाठी सध्या देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 587 रुग्ण आहेत. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 11 जणांचा बळी गेला आहे. महाराष्ट्रामध्ये 122 रुग्ण आहेत. चार जणांचा बळी गेला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे सेवा 14 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.