Friday, March 29, 2024
Homeदेशदिल्ली हिंसाचारात मृतकांचा आकडा ४८ वर!

दिल्ली हिंसाचारात मृतकांचा आकडा ४८ वर!

Delhi Jafrabad Violence,Delhi Jafrabad, Violence,Delhi, Jafrabad Violenceनवी दिल्ली : दिल्लीमध्ये मागील तीन दिवस सुरु असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत ४८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आज गुरुवार (२७ फेब्रुवारी) सकाळी ६ जखमींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच हिंसाचारग्रस्त भागातून इतर २ मृतदेह देखील मिळाले आहेत. दिल्लीच्या जीटीबी रुग्णालयात ३० जणांचा आणि एलएनजीपी रुग्णालयात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. या व्यतिरिक्त ३६४ जखमी लोक रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

दिल्लीतील हिंसाचारानंतर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये १८ एफआयआर दाखल करण्यात आल्या. यानंतर १३० आरोपींना अटक करण्यात आली आहे. बुधवारी (२६ फेब्रुवारी) कोणतीही मोठी हिंसेची घटना समोर आलेली नाही. मात्र मौजपूरसह काही ठिकाणी रात्रीच्यावेळी थोड्याफार हिंसाचाराचे प्रकार घडले. दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान संवेदनशील भागात सातत्याने गस्त घालत आहेत. हळूहळू दिल्लीतील हिंसाग्रस्त भागातील स्थिती रुळावर येताना दिसत आहे. मात्र, अद्यापही परिस्थिती तणावपूर्ण आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments