मुंबई : घाटकोपर येथील खैरानी रोड परिसरात २५ गोडाऊन भीषण आगीत जळून खाक झाले. थिनरच्या गोडाऊनाला आग लागली त्यानंतर इतर गोडाऊनही त्या आगीमध्ये जळून भस्मसात झाले. आगीमुळे परिसरात एकच भीती निर्माण झाली. आगीच्या धुरामुळे आजूबाजुच्या नागरिकांनी घरांमधून पळ काढला. परंतु यामध्ये सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
#Maharashtra | A warehouse where #Fire breaks out near khairani road, #Ghatkopar (Video Courtesy : Social Media)#Mumbai pic.twitter.com/DTG453cPXK
— Afternoon Voice (@Afternoon_Voice) December 27, 2019
आगीमुळे धुराचे प्रचंड लोट परिसरात पसरले असून वाहतुकीलाही अडथळा निर्माण झालाय. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १७ गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी आल्यात आणि त्यांनी बचाव कार्याला सुरुवात केली. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत सातत्याने आगी लागत असून या घटना वाढल्याने अग्निशमन दलाची चिंता वाढली आहे. अग्निशमन दलाने दिलेल्या सुरक्षाविषयक सुचनांचं पालन दुकानदार करत नाहीत त्यामुळे आगीच्या घटना घडतात असं निरिक्षण अग्निशमन दलाने नोंदवलं आहे. घाटकोपर परिसरात आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.