Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईदेवेंद्र फडणवीस तुम्ही सत्ता गमावली की स्वनियंत्रण; जयंत पाटलांचा टोला

देवेंद्र फडणवीस तुम्ही सत्ता गमावली की स्वनियंत्रण; जयंत पाटलांचा टोला

Devendra Fadnavis Jayant Patil,Devendra, Fadnavis, Jayant, Patilमुंबई : गेट वे ऑफ इंडिया येथे  दिल्लीतील जेएनयू विद्यार्थ्यांवर  हल्ला प्रकरणी आंदोलन करण्यात आले. त्यावेळी निषेध करण्यासाठी ‘फ्री काश्मीर’चे पोस्टर झळकवण्यात आले. त्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन मुख्यमंत्र्यांना सवाल उपस्थित केला होता. त्याला नामदार जयंत पाटील यांनी ट्विटरवरून प्रतिउत्तर दिले. फडणवीस तुम्ही सत्ता गमावली की स्वनियंत्रण असा सवाल केला.

जेएनयू येथील हिंसाचार विरोधात गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन करणा-या निदर्शकांच्या हातात स्वतंत्र काश्मिरचे बॅनर आढळून आले. याबाबतचा व्हिडीओ ट्विट करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. नेमके आंदोलन कशासाठी? स्वतंत्र काश्मिरची घोषणाबाजी का? मुंबईत अशा प्रकारच्या फुटीरतावादी तत्वांना कसे काय सहन करायचे? आपल्या नाकाखाली देशविरोधी तत्वांनी स्वतंत्र काश्मिरची मोहिम चालवायची आहे. ती आपण सहन करणार का? असा थेट सवाल फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना केला होता.

देवेंद्र फडणवीसांच्या त्या प्रश्नांचा ना. जयंत पाटील यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले. फडणवीस तुम्ही सत्ता गमावली का स्वनियंत्रण तुमच्या सारखा जबाबदार नेता संभ्रम निर्माण करतो. काश्मीरमध्ये केंद्राकडून अनेक प्रकारचे निर्बंध लादण्यात आलेले आहेत. तेथील इंटरनेट, मोबाइल सेवा तसेच अन्य विविध सेवा बंद आहेत. या निर्बंधांतून काश्मीरला मुक्त करावे, अशी भावना हे पोस्टर झळकवण्यामागे होती. भाजप नेहमीच विषयांतर करण्यात माहिर आहेत आणि सध्या ते तेच करत आहेत. असंही जयंत पाटलांनी एका वृत्तावाहिनीशी बोलताना सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments