Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रउध्दव ठाकरेजी संचारबंदी लागू करा - जितेंद्र आव्हाड

उध्दव ठाकरेजी संचारबंदी लागू करा – जितेंद्र आव्हाड

Dr Jitendra Awhadमुंबई : कोरोनामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती असतानाही लोक गांभीर्याने घेत नाही आहेत. त्यामुळे संचारबंदी लागू केली पाहिजे अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. संचारबंदी हा एकमेव उपाय असल्याचंही ते म्हणाले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: अनेक ठिकाणी फिरुन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी लोक परिस्थिती गांभीर्याने घेत नसल्याचा अनुभव आला आहे.

राज्यात कोरोनाचे 89 रुग्ण झाले आहेत. 31 मार्चपर्यत लॉकडाऊन आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यवहार बंद आहेत. कामाशिवाय लोक बाहेर गर्दी करत आहेत. त्याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी चिॆता व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments