नवी दिल्ली : ज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली त्यानंतर राहुल गांधींनी मोठं विधान केलं. ज्योतिरादित्यांना राजकीय भवितव्याबद्दल भीती होती. त्यामुळेचं त्यांनी विचारधारा बदलली असा दावा केला आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत ज्योतिरादित्य शिंदेंचा पराभव झाला होता. पराभवामुळे ज्योतिरादित्य चिंतेत होते. त्यामुळे ते संघाच्या विचारधारेसोबत गेले. भाजपामध्ये त्यांना तो सन्मान मिळणार नाही. माझी त्यांच्यासोबत मैत्री आहे. त्यांच्या तोंडातून जे निघतं आहे ते आणि ह्दयात वेगळ आहे. त्यांना भाजपात काँग्रेस सारखा तो सन्मान मिळणार नाही. असंही राहुल म्हणाले.