मुंबई : महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाल्यापासून भाजपचे नेते दररोज नवनवीन विधाने करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना टोला लगावला. ‘मुंगेरीलाल के सपने’ तसे ‘मुनगंटीवार के सपने’ असं पुस्तक पाच वर्षानंतर प्रसिध्द करु असा टोला लगावला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, नारायण राणे, देवेंद्र फडणीस व इतर नेते रोज उदया आपलंच सरकार येणार या स्वप्नात ते असतात. वेगवेगळी विधाने करतात. या सर्व पार्श्वभुमीवर जयंत पाटील माध्यमांशी बोलताना त्यांनी मुनगंटीवर आणि भाजपच्या इतर नेत्यांना टोला लगावला. मुनगंटीवर हे पाच वर्ष अर्थमंत्री असताना फक्त महाराष्ट्रातील जनतेला स्वप्नेच दिली. त्यातील काही पूर्ण झाली नाहीत. ते विरोधी पक्षात आहेत. रोज उद्या आपलंच सरकार येणार या स्वप्नात ते आहेत.
कधी मुस्लिम आरक्षण, इतर मुद्यांवरून शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी हे पक्ष वेगळे होतील का? अशा प्रकारचं स्वप्नरंजन मुनगंटीवार करत आहेत. असा टोलाही पाटील यांनी लगावला. त्याला भाजप काय उत्तर देणारं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.