मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड पुकारून भाजपला पाठिंबा दिल्यानंतर बेपत्ता झालेल्या आमदारांपैकी राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार अनिल भाईदास पाटील परत येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ट्विटरवरून दिली आहे.
राष्ट्रवादीकडे सध्या ४९ आमदार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आणखी एक आमदार शरद पवार यांच्या गटात परतणार असल्याने ही संख्या ५० वर जाण्याची शक्यता आहे. दोन आमदारांच्या कुटुंबियांनी त्यांच्याशी संपर्क होत नाही. अशी तक्रार पोलिसांकडे केली आहे.
और एक गायब विधायक ने आने के संकेत दिए …… pic.twitter.com/5AeYh16D9K
— Nawab Malik (@nawabmalikncp) November 24, 2019
शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षाचं सरकार अस्तित्वात येणार असल्याचे जवळपास निश्चित होते. मात्र, शनिवारी सकाळी भाजपने गुपचूप देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.