दिल्ली : भाजपने गुपचूप सरकार स्थापन केले ते सरकार 79 तासात कोसळले. यामुळे भाजपची नाचक्की झाली. यावर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तोफ डागली. भाजपाने महाराष्ट्रात निर्लज्ज प्रयत्न केले” पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांचे प्रयत्न फसले. असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.
राज्यात महिनाभराच्या सत्तासर्घषानंतर आज महाविकास आघाडीचे सरकार येत आहे. शिवेसना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी महिनाभरात घडलेल्या राज्यातील नाट्यमय घडामोडी आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या समर्थनाने भाजपाने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थापन केलेले तीन दिवसांचे सरकार या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपावर तोफ डागली आहे.