Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeदेश१०० स्मार्ट सिटीच्या गाजरानंतर सरकारचं १०० विमानतळाचं गाजर

१०० स्मार्ट सिटीच्या गाजरानंतर सरकारचं १०० विमानतळाचं गाजर

pm modi says open 100 additional airports in the next five years
पाच वर्षांमध्ये १०० ‘स्मार्ट शहरं’ उभारण्याचं वचन मोदी सरकारने २०१५ साली दिलं होतं. परंतु ते वचन पूर्ण झालं नाही. आता मोदी सरकार २०२४ पर्यंत देशभरात नवीन १०० विमानतळ बनवण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे १०० ‘स्मार्ट शहरं’च काय झालं असा प्रश्न उपस्थित होतं आहे.

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोदी सरकारने काम करणे सुरू केले आहे. सरकार २०२४ पर्यंत देशभरात नवीन १०० विमानतळ बनवण्याचा विचार करीत आहे. सरकार हा निर्णय लवकरच घेणार असून एक हजार नवीन मार्ग बनवण्याचाही विचार करीत आहे. हे मार्ग छोट्या शहरांना तसेच गावांना जोडण्याचे काम करणार आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या एका बैठकीत २०२५ पर्यंत गरजेच्या इन्फ्रास्ट्रक्चरची समीक्षा करण्यात आली. देशात विमान भाडे फायनान्सियल बिझनेस यावरही चर्चा करण्यात आली. नवीन विमानतळ सुरू करण्याबरोबरच प्रत्येक वर्षी ६०० पायलट यांना स्थानिक स्तरांवर प्रशिक्षित करण्याचा प्रस्ताव दिला जाईल. तसेच पाच वर्षात विमानांची संख्या दुप्पट करून ती १२०० पर्यंत पोहोचवण्यात येणार आहे, यावरही चर्चा करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments