पुणे : दिवे घाटात वारकरी दिंडीत जेसीबी घुसल्याने दोन वारक-यांचा मृत्यू झाला असून पंधरा वारकरी जखमी झाले. संत नामदेव महाराज यांचे १७ वे वंशज सोपान महाराज नामदास आणि अतुल महाराज आळशी अशी निधन झालेल्या वारक-यांची नावं आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी घडली.
संत नामदेव महाराज यांची पालखी दरवर्षी निघत असते. दरवर्षी हजारो वारकरी यामध्ये सहभागी होतात. पंढरपूरवरून आळंदीला पालखी परत येत असताना दिवे घाटात आज सकाळी अपघात झाला. पालखी दिवेघाटात असताना जेसीबी अचानक या पालखीत घुसली. त्यामुळे दोन जणांचा मृत्यू झाला. पंधरा जण जखमी आहेत. सर्व जखमींवर उपचार सुरु आहे. पालखीला पोलीस बंदोबस्त दिला नव्हता असा आरोपही पालखीच्या आयोजकांकडून करण्यात आला.