Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeदेशराहुल गांधींचा भाजपला सवाल, ‘पुलवामा हल्ल्याचा’ कुणाला झाला फायदा!

राहुल गांधींचा भाजपला सवाल, ‘पुलवामा हल्ल्याचा’ कुणाला झाला फायदा!

Rahul Gandhi Narendra Modi Pulwama,Rahul Gandhi, Narendra Modi, Pulwama,Rahul, Gandhi, Narendra, Modi, Pulwamaनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या वेळी पुलवामा दहशतवादी हल्ल्या झाला होता. आज शुक्रवार ( १४ फेब्रुवारी) रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहेत. या हल्ल्यात केंद्रीय राखीव दलाचे ४० जवान शहीद झाले होते. यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तीन प्रश्न उपस्थित केले आहेत. यावरून सत्ताधा-यांनी उलट सवाल केले आहेत.

काय विचारले राहुल गांधीनी तीन प्रश्न….

पुलवामा हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कुणाला झाला

हल्ल्याच्या तपासात काय निष्पन्न झालं.?

ज्या त्रुटींमुळे दहशतवाही हल्ला झाला, त्यासाठी भाजप सरकारमधल्या कुणाला जबाबदार धरण्यात आलं.

त्यानंतर भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी राहुल गांधी यांना उलट सवाल केला. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्येचा कुणाला फायदा झाला असा सवाल केला. यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये वाद रंगण्याची चिन्हे दिसून येत आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments