ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर प्रकृतीमुळे त्रस्त आहेत. त्यामुळे नेहमीच रणबीरच्या लग्नाची चर्चा होते. यावर्षी डिसेंबरमध्ये अयान मुखर्जीचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर रणबीर कपूर आणि आलीया भट या दोघांचे लग्न होणार आहे. रणबीर आणि आलियाची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ४ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातून आलिया आणि रणबीर पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर १८ डिसेंबर रोजी हे दोघे साताजन्माच्या गाठीत अडकणार आहेत.
View this post on Instagram
आलिया – रणबीरच्या लग्न लवकरात लवकर व्हावे, अशी ऋषी कपूर यांची इच्छा आहे. मुलाने लवकरात लवकर लग्न करुन सेटल व्हावे, असे त्यांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी ऋषी कपूर यांची तब्येत खालावली, त्यानंतर त्यांना न्यूयॉर्कमध्ये उपचारासाठी बराच काळ रहावे लागले होते. अलीकडेच पुन्हा एकदा तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. अशा परिस्थितीत कपूर कुटुंबीयांनी रणबीरच्या लग्नाची तारीख निश्चित केल्याचे वृत्त आहे. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत ऋषी कपूर म्हणाले, मला मरण्यापूर्वी फक्त माझ्या नातवंडांसोबत वेळ काढायचा आहे. आतापर्यंत अनेकदा रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या तयारीच्या बातम्या आल्या. पण यावेळी कपूर कुटुंबीयांनी लग्नाची तारीख निश्चित झाल्याचे सांगितले आहे.