मुंबई : अजित पवारांना फोडण आणि सरकार स्थापन करणं हा भाजपाचा डाव होता. तो त्यांच्यावर उलटला आहे. अजित पवारांबरोबर राष्ट्रवादीचे २५ आमदार येतील आणि बहुमत सिद्ध करता असं त्यांना वाटलं होतं. त्यामुळे अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद दिलं. परंतु सर्व आमदार राष्ट्रवादीत परतले. अजित पवारांना फोडल्याचा डाव भाजपवर उलटला असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत लगावला.
भाजपाकडं बहुमत होतं, त्यांनी काळोखात शपथ का?” असा सवाल संजय राऊत उपस्थित केला. भाजपाला आणीबाणीविषयी बोलण्याचा अधिकार राहिलेला नाही, “राज्याचा मुख्यमंत्री शपथ घेतो आणि हे राज्यातील जनतेलाच माहिती होत नाही. हे म्हणजे पाकिट मारणाऱ्या लोकांसारखच आहे. अजित पवारांना फोडणं आणि सरकार स्थापन करणं हा शेवटचा डाव होता. तो भाजपावर उलटला आहे. काल सरकार स्थापन केल्यानंतर भाजपानं मोजक्या लोकांना पेढे आणि लाडू भरवले, पण ते त्यांच्या घशाखाली उतरलेले नाहीत,” असा चिमटाही राऊत यांनी भाजपाला काढला.