Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeदेशदिल्लीमध्ये दंगली होत राहिल्या सरकार बघ्याच्या भूमिकेत राहिले : सोनिया गांधी

दिल्लीमध्ये दंगली होत राहिल्या सरकार बघ्याच्या भूमिकेत राहिले : सोनिया गांधी

Sonia Gandhi, DK Shivkumar, Congress, ED, INC Media caseनवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील हिंसाचारानंतर आज पाचव्यादिवशी परिस्थिती नियंत्रणात आहे. मृतकांचा आकडा ३४ च्या पुढे गेला आहे. हा हिंसाचार पूर्वनियोजीत कट होता. भाजपच्या नेत्यांनी दंगल घडवली. या हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार असून, गृहमंत्री अमित शाहांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली होती. दिल्लीतल्या स्थितीवर काँग्रेस मुख्यालय ते राष्ट्रपती भवन असा मार्च काढून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन सादर केले. दिल्लीत हिंसाचार होत असताना सरकराने तीन दिवस बघ्याची भूमिका घेतली. अशी टीका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली.

दिल्लीतल्या जनतेनं शांतता राखावी असं आवाहन सोनिया गांधी यांनी केलं आहे. गेल्या तीन दिसांपासून हिंसाचार सुरु असताना गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काय करत होते. विरोधकांशी सत्ताधा-यांनी कोणतीही चर्चा केली नाही. पोलिस बंदोबस्त का वाढवला नाही. दंगल शांत करण्याचा कोणताही प्रयत्न का झाला नाही असे अनेक प्रश्न सोनिया गांधींनी उपस्थित केले.

दिल्ली हिंसाचारात आतापर्यंत ३४ लोकांचा बळी गेला आहे. तर, २०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. दुकानांची, वाहनांची तोडफोड, जाळपोळ करण्यात आली. दिल्लीतील हिंसाचार रोखण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे. कायदा सुव्यस्था नियंत्रणात आणण्यासाठी हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपती भवनावर मार्च काढण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments