मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यावेळी बोलताना शरद पवारांनी मोठ विधानं केलं. न्यूयॉर्कला गेल्यावर स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला पाहण्यासाठी जसे आवर्जून लोक जातात तसं मुंबईत डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी लोक येतील. येत्या दोन वर्षात इंदू मिल इथल्या डॉ. आंबेडकर स्मारकाचं काम पूर्ण व्हायला हवं, असं शरद पवार यांनी व्यक्त केलं.
स्मारकाच्या जागेची पाहणी केल्यानंतर पवारांनी पत्रकारांशी बातचित केली. आंबेडकर स्मारकाचं काम दोन वर्षात पूर्ण होणं शक्य आहे, असंही पवार म्हणाले. याहून अधिक उशीर यासाठी नको, असंही ते म्हणाले. गर्दीच्या काळात स्मारकाची विशेष काळजी घ्यावी लागेल, असं त्यांनी सांगितलं.
‘महाविकास आघाडी सरकारकडून २०२२ पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं इंदू मिल येथील स्मारक पूर्ण केलं जाईल,’ अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. ‘मुंबईत आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला पाहावसं वाटेल असं भव्य दिव्य स्मारक उभा करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असंही अजित पवार यांनी सांगितलं होतं. आज पवारांच्या सोबत ना. नवाब मलिक आणि ना. धनंजय मुंडे उपस्थित होते.