Thursday, April 25, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखरोहिंग्या हिंदूंवरही हल्ले का?

रोहिंग्या हिंदूंवरही हल्ले का?

रोहिंग्या मुस्लीमच नाहीत तर रोहिंग्या हिंदूंना सुद्धा म्यानमारमधून पलायन करावं लागत आहे. ही चिंतेची बाब आहे. राखिन प्रांतात त्यांच्यावरसुद्धा अत्याचार होत आहे. बांगलादेश-म्यानमार सीमेवरच्या एका गावातली लोक जेवणाची व्यवस्था करण्यात आली. हातपंपावर पाणी भरण्यासाठी लोकांना रांगा लावाव्या लागत आहेत. पण, यामध्ये गरोदर महिलांचाही सहभाग आहे. पंधरा वर्षीय अनीता धरच्या घरात, ”काही लोकं चेहऱ्याला काळे रूमाल बांधून घुसले होते.

त्यांनी घराची नासधूस केली आणि तिच्या पतीला उचलून नेले. “दुसऱ्या दिवशी शेजारच्या जंगलात त्याचा मृतदेह मिळाला. शिर आणि हात कापलेले होते. पोटात असलेल्या बाळाचा विचार न करता अनीता तिथून पळाली. तीन दिवस जंगलात उपाशीपोटी फिरत-फिरत शेवटी इथं पोहोचले.”बांगलादेश म्यानमारच्या सीमेवरच्या गावात पोहोचली. अनीता प्रमाणे इतर १६० रोहिंग्या हिंदू कुटुंब म्यानमार सोडून बांगलादेशातल्या कॉक्स बाजारच्या कुतुपालोंग परिसरात पोहोचले आहेत. मुस्लिमांप्रमाणे हिंदूंचेही हाल होत आहेत. म्यानमारच्या राखिन प्रांतात रोहिंग्या मुस्लीमांप्रमाणे हिंदू लोकंही राहतात. साडे चार लाख रोहिंग्या मुस्लिमांप्रमाणेच दीड महिन्यांपूर्वी हिंदूसुद्धा बांगलादेशात पळून आले आहेत. रोहिंग्या मुस्लिमांप्रमाणेच अल्पसंख्याक असलेल्या हिंदूकडे सुद्धा म्यानमारचं नागरिकत्व नाही. ५५० हिंदू लोकांपैकी बहुतेकांचं म्हणणं आहे की त्यांनी वांशिक हिंसाचारामुळेच पलायन केलंय. शोभा रूद्र सुद्धा या शरणार्थींपैकीच एक आहेत. पण, त्यांच्या चेहऱ्यावर थोडसं समाधान आहे. कारण त्यांच्यासोबत त्यांचं संपूर्ण कुटुंब पळून येण्यात यशस्वी झालं आहे.

शोभा रुद्र नावाच्या महिलेच्या काकांच्या घरावर हल्ला झाला आणि त्यांना गोळी मारण्यात आली. बलात्कार करून चुलत बहिणीला मारून टाकण्यात आलं. त्यांनतर त्यांना पळून जाव लागलं. ते सर्व इतकं भयंकर होतं की, आता आम्ही कधीच तिथं परत जाणार नाही. इथं निदान आम्हाला शांततेनं जगता तरी येत आहे. अशा प्रतिक्रिया महिलेकडून व्यक्त करण्यात आल्या. विदारक आणि संताप आणणाऱ्या घटना घडत आहेत. इथं कुणी आमच्यावर तुटून पडत नाही.” अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. बांगलादेश आणि म्यानमारच्या सीमावर्ती भागात बांगलादेशच्या हद्दीत २५ हिंदू कुटुंब राहतात.
त्यांनी या शरणार्थींना आश्रय दिला आहे. पण, या स्थानिक अल्पसंख्याक हिंदूंची परिस्थिती फार काही चांगली नाही.

काही संस्थांच्या मदतीनं गावातल्या ‘मुर्गी फार्म’वर त्यांनी शरणार्थींसाठी एक कॅम्प उभारला आहे. सकाळ-संध्याकाळ इथं जेवण बनवलं जातं आणि शरणार्थींना वाढलं जातं. कॅम्पच्या चारही बाजूला असलेल्या घरांमध्ये महिला आणि मुलांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. काही लोकांनी स्वत:च्या घरात व जागांमध्ये आश्रय दिला आहे. शरणार्थींना आपलं घर सोडल्यापासून ते पोरके झाले आहेत. पण, आता एका अनोळखी देशात त्यांना आश्रय मिळाला आहे. फक्त रोहिंग्या मुस्लीमच नाहीत तर रोहिंग्या हिंदूंनासुद्धा म्यानमारमधून पलायन करावं लागत आहे. राखिन प्रांतात त्यांच्यावर सुद्धा अत्याचार होत आहे. या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments