Friday, April 19, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखअडीच लोकांच सरकार?

अडीच लोकांच सरकार?

‘ढाई अक्षर प्रेम के’ चित्रपट सर्वांनाच आठवत असेल. कारण आता विषय निघाला आहे अडीच लोक सरकार चालवत असल्याचा! हा विषय कुणी काढला असेल तर ते दस्तुरखुद्द भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण शौरी यांनी! यशवंत सिन्हानंतर आता अरुण शौरींनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका केली आहे. नोटबंदी हा आत्मघाती निर्णय होता. नोटबंदी हा साहसी निर्णय नसून हा निर्णय आत्महत्या करण्यासारखा आहे. सध्याचे सरकार हे फक्त अडीच लोक चालवत असल्याचे सांगत, केंद्र सरकार टीका केली. काही दिवसांपूर्वीच माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी ढासळत्या अर्थव्यवस्थेत नोटबंदीने आगीत तेल ओतण्याचे काम केल्याचे म्हटले होते. हा केंद्र सरकारसाठी खूप चिंतेचा विषय आहे. केंद्र सरकारच्या कामकाजावरच भाजपाचेच नेते जर टीका करत असतील तर भाजपाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. शौरी यांनी जनतेच्या मनातील प्रश्न उपस्थित केले आहेत. आज प्रत्येकजण विचार आहेत मोदींनी नोटा बंदी करतांना जे कारण दिले होते त्यात कितपत सत्यता आहे. किती काळे धन पूर्णपणे आता व्हाइट झाले का? दशहतवादी आजही हल्ला करत आहेत.

सरकारकडे सांगण्यासारखे आज काहीच नाही. अमित शहांनी तांत्रिक कारणांमुळे मंदीचे वातावरण असल्याचे विधान केले होते. हे कुणालाही न पटणार वक्तव्य होतं. त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना शौरी यांनी घेतलं, ‘शहा काय प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आहेत का? तुम्ही सरकारी आकडे फार दिवस लपवून ठेवू शकत नाही.’ जर एका मागून एक भाजपाचीही मंडळी सरकारच्या कामाचे वाभाडे काढत असेल तर त्यामध्ये सत्यता आहे. विरोधकांकडून आधी आरोप होत होता की सरकार आमचे ऐकत नाही. परंतु काही दिवसांपूर्वीच भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींपुढे आपले म्हणणे मांडले होते. त्यावेळी मोदी यांनी ‘आपको समझता नही’ असे बोलून त्यांना गप्प बसवले होते, तेव्हा पासून पटोले यांनीही सरकारच्या कामकाजावर टीका करायला सुरुवात केली होती. आता शौरी म्हणाले की, केंद्र सरकार कोणाचेही ऐकून घेत नाही. त्यांना सत्य जाणून घेण्याची आणि कोणाची सूचना ऐकण्याची इच्छा नाही. जर अशा प्रतिक्रिया केंद्र सरकारच्या पक्षातील मंडळीकडून येत असेल तर त्यामध्ये सत्यता आहे. आरबीआयने लघु आणि मध्यम उद्योजकांना संकटात टाकले आहे. असे शौरी म्हणाले, ‘यशवंत सिन्हा, पी. चिदंबरम आणि इतरही अर्थतज्ज्ञ वारंवार सांगत आहेत. इकॉनॉमिक सर्व्हे, आरबीआय सर्व्हेमधूनही सत्य समोर येत आहे. जीडीपी घसरुन ३.७ वर गेला. २०१५-१६  मध्ये इंडस्ट्रियल प्रोडक्शन ९५%  होते, या वर्षी एप्रिल-जुलै दरम्यान त्यात घसरण होऊन थेट १.७% वर पोहोचले आहे. ही चिंतेची बाब आहे. ‘नोटाबंदी ही मनी लाँड्रिंग स्किम होती. हा मूर्खपणाचा झटका होता.

नोटबंदी करून मोठ्या प्रमाणावर काळा पैसा पांढरा करण्यात आला आहे. तब्बल ९९ टक्के जुन्या नोटा बँकेत परत आल्याचं सांगून भारतीय रिझर्व्हे बँकेने त्याचा पुरावाच दिल्याचा आरोप शौरी यांनी केला. देशाच्या अर्थव्यवस्थेत काहीच सुधारणा होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. हे निव्वळ इव्हेन्ट मॅनेजमेंट सरकार आहे. त्यांचा फोकस केवळ इव्हेन्ट मॅनेजमेंटवर आहे. केवळ मोठमोठ्या गोष्टी सांगण्यासाठी मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेत काहीच सुधारणा होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. हि चिंतेची बाब आहे. जर अशीच परिस्थिती असेल तर सरकारने विरोधकांचे सोडा त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे ऐकावे अन्यथा सरकारला अच्छे दिन सोडा,बुरे दिन बघावे लागतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments