Tuesday, April 23, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखखटारा एस.टी ला अच्छे दिन कधी येणार!

खटारा एस.टी ला अच्छे दिन कधी येणार!

प्रवाशांच्या सेवेसाठी हे बीद्र घेऊन एस.टी महामंडळाची सेवा सध्या सुरु आहे. एस.टी महामंडळाकडून परिवहन खात्याचे  एस.टीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहेत. यामुळे ना नफा ना तोटा या तत्वावर सुरु असलेली सर्वसामान्यांच्या ‘खटारा एस.टी ला अच्छे दिन’ तर आलेच नाही, उलट परिवहन खात्यातील मंडळींनाच अच्छे दिन आले आहेत. खटारा एस.टी महामंडळ खटारा बनत चालले आहे. दररोज राज्यात ६५ ते ७० लाख प्रवासी एस.टीने प्रवास करतात तरीही एस.टी तोट्यात असल्याची ओरड होतांना दिसत आहेत. जानेवारी २०१६ मध्ये परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष दिवाकर रावते यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सोहळ्यात शिवशाही बसची घोषणा केली होती. त्यावेळी ५०० बसेस लवकरच ताफ्यात सामील होतील, असे जाहीर करण्यात आले.

एसटी महामंडळांने लाखो प्रवाशांना दाखवलेल्या वातानुकूलित संपूर्ण  ‘शिवशाही’ बसचे स्वप्न या वर्षांतही पूर्ण होणार नाही. शिवशाही बस दाखल करण्याची जानेवारी २०१६ मध्ये घोषणा होऊनही आतापर्यंत २००० पैकी १३ बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत आणि चार मार्गावर त्यांची सेवा सुरु आहे. स्वत:च्या मालकीच्या आणि भाडेतत्वावरील अशा ५७ बस पुढील महिन्यात दाखल होतील. वायफाय, सीसीटीव्ही व स्लीपर कोचच्या सुविधा असलेल्या शिवशाही बसचे पहिले दर्शन जानेवारी २०१६ मध्ये परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष दिवाकर रावते यांनी घडवले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सोहळ्यात शिवशाही बसची घोषणा करण्यात आली. त्यावेळी ५०० बसेस लवकरच ताफ्यात सामील होतील, असे जाहीर करण्यात आले होत. भाडेतत्वावर या बसेस महामंडळांला पुरवण्यात येणार होत्या. त्यात चालक कंपनीचा तर कंडक्टर हा महामंडळांचा असणार होता. मात्र, वर्षभरात शिवशाही बसेस प्रत्यक्ष ताफ्यात सामील होण्याची तारीख कधीच जुळून आली. थेट जून २०१७ रोजी पुन्हा शिवशाही बसला परिवहन मंत्र्यांकडून हिरवा झेंडा दाखवण्यात आला आणि शिवशाही बस दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली. भाडेतत्वावरील ५०० बसची संख्याही वाढवण्यात आली. ५०० वरून थेट ही संख्या १५०० पर्यंत नेण्यात आली. तर ५०० वातानुकूलित शिवशाही बस या स्वत:च्या मालकीच्या घेण्यात येणार होत्या. अशा तऱ्हेने दोन हजार वातानुकूलित शिवशाही बस दाखल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. भाडेतत्वावरील १,५०० पैकी ५०० बस तर १५ ऑगस्टपर्यंत एसटीच्या ताफ्यात दाखल होणार होत्या. परंतु ही मुदतही उलटून गेली. आतापर्यंत एसटीच्या ताफ्यात १३ शिवशाही बसच दाखल असून यामध्ये एक बस  एसटीच्या मालकीची आहे. तर ऊर्वरीत बस या भाडेतत्त्वावरील आहेत. १३ बस या पुणे-लातूर, पुणे-सोलापूर, पुणे-कोल्हापूर, मुंबई-रत्नागिरी मार्गावर धावतात. मंत्री मोठ मोठ्या घोषणा देऊन मोकळे होतात. परंतु अंमलबजावणीच्या नावाने भट्याभोळ आहे. एस.टीच्या ज्या बसेस आहेत त्या खटारा बनल्या आहेत. खाजगी वाहतूकदारांच्या स्पर्धेत एस.टी मुकाबला करु शकत नाही. एस.टीकडे लक्ष दिले तरच प्रवाशांच्या सेवेसाठीचे ते खरे उतरतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments