Thursday, March 28, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखनानांचे स्वयकियांविरोधात ना..ना…!

नानांचे स्वयकियांविरोधात ना..ना…!

नोटाबंदी आणि जीएसटीवरुन सरकारच्या विरोधात रोष व्यक्त सुरु असतांना भाजपाचेच खासदार गोंदिया-भंडाराचे  नाना पटोले यांनी त्यांच्याच सरकारच्या विरोधात आवाज उठवल्यामुळे सरकारची प्रतिमा डागळली आहे. हे होत असतांना त्यांच्याच पक्षाचे माजी वित्तमंत्री भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनीही नोटबंदीवरुन सरकारला लक्ष्य केले. यामुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाले. काही दिवसांपासून नोटाबंदी आणि जीएसटीवरुन भाजप खासदार पटोले यांनी सरकारच्या कामाचे वाभाडे काढले. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे व्यापाऱ्याचं कंबरडं मोडलं आहे. तर शेतकरीही अडचणीत आहेत. त्यामुळे व्यापारी, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी वेगळी चळवळ उभी करण्याचं नाना पटोले यांनी जाहीर केलं आहे.

यापूर्वीही नाना पटोले यांनी शेतकरी कर्जमाफीवरुन सरकारवर हल्लाबोल केला होता. राज्य सरकारनं सप्टेंबरपर्यंत कर्जमाफीसंदर्भात ठोस पावलं उचलावी अन्यथा आपण इतिहासाची पुनरावृत्ती करु शकतो, असं म्हणत नाना पटोले यांनी अप्रत्यक्षपणे राजीनाम्याचे संकेत दिले. पटोले यांनी २००९ मध्ये काँग्रेसमध्ये असताना कर्जमाफीच्या मुद्द्यावर स्वपक्षीयांवर हल्लाबोल करत आमदारकीचा राजीनामा दिला होता. कुणाच्या खुर्चीवर असल्याने सर्वसामान्यांचे प्रश्न मांडता येत नसतील, तर ती खुर्चीच परत देऊ असं म्हणत पटोले यांनी पुढचे संकेत दिले.

मोदी सरकार हे अंबानी आणि अदानी यांची घरं भरण्याचं काम करत असल्याचा आरोप पटोले यांनी केला. एनडीएमध्ये सत्ताधारी पक्षातूनच विरोध वाढत चालला आहे. पटोले हे शेतकरी कुटंबातील नेते असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण आहे. त्यांनी बोलण्याची हिंमत केली हेच त्यांची खरी ताकद. सत्तेत राहून जर चुकीचे काही घडत असेल तर त्याच्याविरोधात बोलण्याची हिंम्मत खूप कमी नेते करतात. सत्ताधारी नेते जर चुकीच्या घटनांवर बोलत असतील ते स्वागतहार्य आहे. माजी वितमंत्री यशवंत सिन्हा यांनी नोटबंदीवरुन सरकारचे वाभाडे काढल्यामुळे सरकारची चांगलीच पंचाईत झाली. विरोधकांनीही यशवंत सिन्हांच्या मताचे समर्थन केले.आम्ही आतापर्यंत हेच बोलत होतो. आता त्यांच्याच पक्षातील नेत्यानींही तेच सांगितले यामुळे विरोधकांच्या आरोपाला बळ मिळाले होते. खासदार पटोलोही आता सरकारच्या कामकाजावर आक्रमक होत चालले असल्यामुळे ते कोणत्याही क्षणी खासदारकीचा राजीनामा देऊन पक्षातून बाहेर पडू शकतात. याचाच अर्थ पक्षाची,सरकारची प्रतिमा त्यांच्याच खासदाराला आवडत नसल्यामुळे सरकार विरोधात आक्रोश वाढत असल्याचे दिसून येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments