Wednesday, April 24, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखलाठीहल्ला संतापजनक!

लाठीहल्ला संतापजनक!

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या बनारस हिंदू विद्यापीठात आंदोलनकर्त्या विद्यार्थिनींवर २१ सप्टेंबर रोजी लाठीमार करण्याचा प्रकार संतापजनक, आणि चिड निर्माण करणारा आहे. विद्यापीठात विदयार्थीनीची छेड काढल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येते आणि त्यांच्यावरच लाठी हल्ला होतो. हा सर्व प्रकार संतापजनक आणि चिड निर्माण करणारा आहे. लाठी हल्याच्या निषेधार्थ सर्वत्र विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरुन या घटनेचा निषेध करत आहेत. विद्यापीठातील सर्व प्रकारणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घेतली आहे. कधी जेएनयु तर कधी बीएचयू मध्ये वाद होतांना दिसत आहेत. विद्यार्थ्यांवर लाठीमार आणि गेल्या चार दिवसांत कॅम्प्समधील घटनांची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश वाराणसी जिल्हा प्रशासनाने दिले. विदयार्थ्यांवर लाठीहल्ला होतो तो कुणाच्या इशाऱ्यांवर होतो हेही तपासणे तितकेच महत्वाचे ठरेल. विद्यार्थ्यांवर लाठीमार, कारवाई करणाऱ्या पोलिसांनी प्रकरणाचा अहवाल वाराणसीचे विभागीय पोलीस आयुक्त नितीन गोकर्ण यांनी मुख्य सचिव राजीव कुमार यांच्याकडे सुपूर्द केला आहे. विद्यापीठ प्रशासनाने हे संवेदनशील प्रकरण योग्यरितीने हाताळले नाही, असा ठपका त्यात ठेवला आहे. पोलीस पथकावर हल्ला आणि हिंसाचारप्रकरणी विद्यापीठातील १००० विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गोकर्ण यांनी हा अहवाल राज्याच्या मुख्य सचिवांकडे सोपवला आहे. पोलिसांनी या प्रकरणी कुलगुरू आणि पीडित मुलीसह १२ जणांचे जबाब नोंदवून घेतले. त्यानंतर या प्रकरणाचा अहवाल तयार करण्यात आला आहे. विद्यापीठ प्रशासनाने हे प्रकरण व्यवस्थित हाताळले नाही.

योग्य वेळेत या प्रकरणी तोडगा काढला असता तर हा वाद निर्माण झाला नसता, असे या अहवालात म्हटले आहे. ‘बीएचयू’मध्ये विद्यार्थिनींना मुलांकडून छेडछाडीला सामोरे जावे लागत होते. या विरोधात या विद्यार्थिनींनी आंदोलन पुकारले होते. मात्र, त्याकडे विद्यापीठ प्रशासनाने गांभीर्याने पाहिले नाही. उलट आंदोलनकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. यासंबंधी कुलगुरुंनी बेजबाबदारपणे उत्तरे देऊन मोकळे झाले आहेत. आंदोलनामागे ‘बाहेरच्या व्यक्ती’ असल्याचा दावा कुलगुरू जी. सी. त्रिपाठी यांनी केला आहे. विद्यापीठाचा परिसर विद्यार्थिनींसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे.

बाहेरील काही व्यक्तींनी स्वार्थासाठी उकरून काढला, असाही दावा त्यांनी केला आहे. तसेच प्रत्येक मुलीचे ऐकले तर विद्यापीठाचा कारभार हाकणे कठिण होऊन बसेल, असे वक्तव्यही त्यांनी केले. असे विधान करणे चुकीचे आणि संतापजनक आहे.  तरुण कायम सत्य आणि न्यायासाठी लढतात. पण येथील विद्यार्थ्यांना जे सत्य वाटते त्यासाठी ते लढत आहेत. काही लोकांचा  स्वार्थ असेलही परंतु आंदोलन कर्तै आपल्या न्यासाठी आंदोलन करत असतील तर त्यांच्यावर लाठीहल्ला करणे कितपत योग्य आहे. पोलिस बळाचा वापर करुन लाठ्या चालवणे हा अतिरेकपणा कसा काय चालतो याचेही उत्तरे पोलिस आणि विद्यापीठ प्रशासनाला द्यावे लागतील. बनारस हिंदू विद्यापीठच नाही तर देशातील अनेक विद्यापीठे अशा मानसिकतेचे बळी पडले आहेत. परंतु ज्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments