Friday, April 19, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखसरकार गडगडणार?

सरकार गडगडणार?

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होऊ शकतात. त्यातच जनमत सरकारच्या विरोधात असल्याने कामाला लागा, असा आदेशच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिले. याचाच अर्थ शिवसेना कोणत्याही क्षणी सरकारचा पाठिंबा काढू शकते व सरकार गडगडू शकते. गेल्या तीन वर्षापासून शिवसेना,भाजपाची नुराकुस्ती सुरु आहे.दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप,प्रत्यारोप करत आहेत.यामुळे दोन्ही पक्षांमध्ये कोणत्याही क्षणी घटस्फोट होऊ शकते अशी सध्याची चिन्हे आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यावर केंद्र सरकारचा कल आहे. त्यामुळे या दोन्ही निवडणुका कधीही होऊ शकतात. त्यामुळे आतापासूनच कामाला लागा, असे आदेशच पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्यामुळे सरकार कोसळू शकते अशीच चिन्हे आहेत. सरकारच्या कामकाजावर सर्व बाजूने टीका होत आहेत. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीवरुन निकषाची भानगड सध्या सुरुच आहे.

सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरल्यामुळे त्याविरोधात लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. जनमत पूर्णपणे सरकारच्या विरोधात गेले आहे, देशातले उद्योग आज बंद पडायला लागले आहेत. गरीब वर्ग नाराज आहे. शेतकरी आत्महत्या करतोय. तर आता तळागाळातला गरीब वर्गही त्याच मार्गाने जातो की काय याची भीती वाटतेय, जापानमध्ये प्रचंड आर्थिक मंदी सुरू आहे. जापानची आर्थिक मंदी घालविण्यासाठीच बुलेट ट्रेनचा प्रकल्प राबविण्याचा घाट घालण्यात आल्याचा आरोप पवार यांनी केला. राज्यातील कारभार सगळा काही आलबेल आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्याचे काम सुरुच आहे. दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणावरुन सडकून टीका केली. तसेच नारायण राणे यांनी एनडीएला पाठिंबा दिल्यानंतर त्यांना भाजपाने त्यांच्या कोट्यातून मंत्रीपद दिले तर तेही शिवसेनेला सहन होणार नाही अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहेत. यामुळे राज्य सरकारला कधीही बुरे दिन येऊ शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments