कोरोना विषाणूमुळे जगभर भीती निर्माण झाली आहे. या चिंताग्रस्त अवस्थेत आपणा सर्वांचा आवडता होळीचा सण साजरा करणार आहोत. होळी हा रंगाचा उत्सव आहे. परस्परांच्या भेटीगाठींचा सण नव्हे तर सद्भावनेच्या थोर परंपरेचे प्रतीक आहे. आपण सर्वांनी सतर्क राहण्याची गरज आहे. मी देवाशी प्रार्थना करते की, होळीच्या आगीत कोरोनाव्हायरस जळो. सगळ्यांना दिर्घायुष्य लाभो.
कोरोनाच्या धास्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी होळी न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तर जनतेला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. विशेष म्हणजे गर्दीच्या ठिकाणी एकत्र जमलेल्या लोकांना याचा धोका आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी प्रवास करण्याचे सर्वजण टाळत आहेत. आग्नेय चीनच्या फुजियान प्रांतात कुआनझोवू शहरात कोरोना व्हायरसच्या ( कोविड-१९) चा उद्रेक झाला असला तरी काही प्रमाणात भारतात कोरोनाचे संशयीत रुग्ण सापडत आहेत. चीनविरोधी ट्रेड वॉर चा भाग आहे का? या विविध दृष्टीकोनातून कोरोनाकडे पाहिले जात आहे. या प्रश्नांची उकल केव्हा ना केव्हा होईलच. परंतु कोरोनाच्या उद्रेक कशामुळे झाला हा महत्वाचा प्रश्न नसून कोरोनाचा प्रसार जगभर होऊ नये. याची उत्तरे शोधणे गरजेचे आहे.
मुंबईसह देशातील विविध विमानतळावर हॉटेल हॉटेल्समध्ये येणा-या परदेशी पर्यटकांनी थर्मल स्क्रीनिंग केली आहे. तपासण्याच्या सूचनाही हॉटेल व्यवस्थापनांना देण्यात आल्या आहेत. जेव्हा स्वाइन फ्लूचा उद्रेक झाला तेव्हा दही हंडी उत्सव रद्द करण्यात आले. बरेच लोक विशेषतः गाड्या आणि विमानांमध्ये मास्क परिधान करताना दिसतात. परंतु हा विषाणू कशाबद्दल आहे हे कोणालाही माहिती नाही. कोरोनाव्हायरस सस्तन प्राण्यांमध्ये श्वसनमार्गावर परिणाम करते; यामुळे सर्व प्रकारची सर्दी होते. यामुळे मोठ्या लक्षणांसह सर्दी होते उदा. प्रामुख्याने हिवाळ्यामध्ये मानवांमध्ये घशात सूज येते. कोरोनाव्हायरसमुळे न्यूमोनिया होऊ शकतो, एकतर थेट व्हायरल निमोनिया किंवा दुय्यम बॅक्टेरियाय न्यूमोनिया आणि यामुळे ब्राँकायटिस देखील होऊ शकतो थेट व्हायरल ब्रॉन्कायटीस किंवा दुय्यम बॅक्टेरियातील ब्राँकायटिस. कोरोनाव्हायरस बर्यावपैकी नवीन आहे ज्याने जगाला धक्का देऊन नेले आहे. उद्रेक होण्यास दोन महिने झाले आहेत आणि हे दिसून आले आहे की ते सार्स विषाणूसारखे घातक नाही. तसेच, संसर्ग झालेल्या व्यक्तीने कोणतीही लक्षणे दर्शविण्यापूर्वी सुमारे दोन आठवडे लागतात. हे त्वरित लक्षात आले नाही.
भारतासह जगातल्या सत्तर देशांमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. चीनपाठोपाठ द. कोरियामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग आढळून आला. भारतही चीनचा शेजारी देश त्यात पुन्हा दाट लोकवस्तीची शेकडो शहरे आणि हजारो गावे या भारत देशात. त्यामुळे कोरोनासंदर्भात काळजी करावी अशी सद्यस्थिती आहे. या पृथ्वीतलावर माणुसकीच्या रंगाहून सुंदर रंग कोणताही रंग नाही. हे लक्षात ठेवा. तुम्हा सर्वांना होळीच्या मनापासून शुभेच्छा! स्वस्थ राहा, आनंदी राहा.