Saturday, April 20, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखफडणवीसची गुंडगर्दी!

फडणवीसची गुंडगर्दी!

त्तेच्या बळावर धाक दाखवून गुंडगिरी करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत भाऊ संजय फडणवीस यांची सत्तेची मस्ती उघडकीस आली. सत्तेच्या जोरावर एकट्या संजय नव्हे भाजपा,संघातील बरेच बगलबच्यांना सत्तेच्या जोरावर माज आलाय,राजरोस धमकावून गुंडगीरी सुरु केली. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणूकीत अर्ज भरताना २२ राजकीय गुन्हे नमूद केले. २ गुन्ह्यांची लपवाछपवी केली. त्याच २ गुन्ह्यांसंदर्भात आवाज उठवणाऱ्या सतीश ऊके यांचे नागपुरातील अॅड अभियान बारहाते यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चुलत भाऊ संजय फडणवीस यांनी फोनवरुन धमकावले व पुढेही सत्ता आमचीच राहणार. याचाच अर्थ तुम्ही लुडबूड करु नका. तुम्हालाही तुरुंगात टाकू नाही तर खून करु असाच होतो. मुख्यमंत्रीचा चुलत भाऊ या नात्याने जर सत्ताधाऱ्यांच्या कुटुंबातील मंडळी गुंडगर्दी करतील तर सर्वसामान्यांनी कुणाकडून अपेक्षा करायची. अॅड सतीश ऊके यांनी निवडणूक अधिकारी, न्यायालय अशा विविध पातळ्यांवर आवाज उठवला. अॅड अभियान बारहाते यांनी सतीश ऊके यांच्यावतीने न्यायालयात एक याचिका दाखल करताच, त्यांना मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाने धमकावल्याची ऑडीओ क्लिप बाहेर आली. माजी खासदार नाना पटोले यांनी ती क्लिप पत्रकार परिषदेत वाजवली. या प्रकरणी अजनी पोलिस ठाण्यात संजय फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशी मागणी ही नाना पटोले यांनी केली. परंतु सत्तेचा एवढा माज कसा? सत्ताधारीच जर गुंडासारखे इतरांना धमकावत असतील तर सत्ताधारी आणि गुंडामध्ये काय फरक समजवावा.भाजपाचे,संघाचे नेते,मंत्री,कार्यकर्ते जे सत्तेच्या जोरावर मस्तवाल भाषा करुन दादागिरी करत आहेत. त्यांच्या दादागिरीमुळे आज देशात,राज्यांमध्ये भय निर्माण झाले. दररोज भाजपाचे बगलबच्चे काही तरी वादग्रस्त विधान करुन जनतेचे लक्ष विचलीत करुन तेढ निर्माण करत आहेत. सत्ताधाऱ्यांना सपशेल अपयश आल्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात वातावर निर्माती होऊ नये म्हणून सत्ता टिकवण्यासाठी कटकारस्थान रचत आहेत.राज्याची,देशाची परिस्थिती बिकट बनली. कर्जाचा डोंगर उभा झाला. बेरोजगारी वाढली. हाताला काम नाही. महागाईने जनता त्रस्त झाली. खुलेआम खून होत आहेत. बलात्काराचे प्रमाण वाढले. महिला असुरक्षित आहेत.सरकारी नोकर दबावात काम करत आहेत. विकासाच्या नावाने हजारो,कोट्यवधी रुपयांच्या घोषणांचा पाऊस पडत आहेत. अशा सर्व परिस्थितीतून जात असतांना जर कुणी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवण्याचा काम करत असल तर त्याला जीवे मारुन टाकायचे किंवा धमक्या द्यायच्या अशी गुंडगर्दी सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचा चुलभाऊ म्हणून संजय फडणवीस यांच्यावर काही कारवाई होणार नाही. कारण भीमा कोरेगाव दंगल ज्यांमुळे लागली ते दोन्ही आरोपी मोकाट फिरत आहेत. सरकार सुडाच राजकारण करत आहेत. विरोधकांना आणि त्यांच्या कामकाजावर बोट ठेवणाऱ्यांचा काटा काढण्याचे आणि त्यांना धमकावण्याचं काम जोरात चालू आहे. संपूर्ण देशात भाजपाच्या विविध संघटनाच्या माध्यमातून हैदोस घातला जात आहे. हाच हैदोस हिच गुंडगर्दी देशाचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments