Thursday, April 18, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखप्रज्ञासिंह बरळल्या!

प्रज्ञासिंह बरळल्या!

हिंदुनो जास्त मुल जन्माला घालावेत अशी ओरड करुन देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम वारंवार होत आहेत. तशीच ओरड केली साध्वी प्रज्ञासिंह यांनी. काय तर इतर धर्मीयांचे वर्चस्व रोखण्यासाठी व हिंदू धर्माचे अस्तित्व टिकवण्यासाठी हिंदूंनी जास्तीत जास्त मुलांना जन्माला घालावे. जे लोक देशासाठी काहीच करीत नाहीत त्यांनी किमान मुलांना तरी जन्माला घालावे. परंतु प्रज्ञासिंहांच डोकंबिक खराब झाल की काय अशी शक्यता वाटते. देशात ८० टक्के हिंदू समाज असतांना इतर कोणत्या धर्मीयांचा वर्चस्व यांना रोखायचा आहे. देशात सर्वसमाज गुण्यागोविंदाने नांदत असतांना संघ व भाजपा तसेच त्यांच्यांशी संबंधीत मंडळी असे बेताल वक्त करुन देशातील महत्वाच्या मुद्यांवरुन लक्ष विचलीत करण्याचे काम करत आहेत. ज्यांची लग्न झाली नाही ती मंडळी जास्त मुलांना जन्माला घाला असा सल्ला देतात. शेवटी त्यांच पालन पोषण हे तथाकथित राजकारणी,व स्वत:ला साधू संत म्हणणारे करत असतील तर हे धक्कादायक आणि देशासाठी चिंताजनक आहे. प्रज्ञासिंह या औरंगाबादेत एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. त्यावेळी हे विधान त्यांनी केलं. ‘भगवा रंग त्यागाचा’ या विषयावर बोलताना त्या म्हणाल्या, मुलांच्या भरणपोषणाची क्षमता नाही म्हणून एकाच मुलावर थांबण्याचा निर्णय घेऊ नका. बाहेरून आलेल्या कित्येक लोकांना नाही तरी आपण देशात खाऊ-पिऊ घालतच आहोत. तुमच्या मुलांना सांभाळण्याची जबाबदारी आम्ही घेऊ. हिंदूंची लोकसंख्या वाढली नाही, तर आगामी काळात इतर धर्म अतिक्रमण करून हिंदूंच्या अस्तित्वावर धोका आणतील, असा इशाराही त्यांना दिला.
शिवाजी महाराजांनी सहा लग्न केल्याचा दाखला देत प्रज्ञासिंह यांनी देशासाठी एकापेक्षा अधिक लग्न केले तरी चालेल. अशी विधान केल्यानंतर संताप येतो.  महागाईने जनता त्रस्त आहेत. आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहेत. बेरोजगारी वाढली. व्यवसाची वाट लागली. उद्योगपतींनी राजकीय मंडळींना हाताशी धरुन देशाला कंगाल करण्याचे काम सुरु केले आहे. कित्येकांनी कंगाल करुन टाकले. आज एक कुटुंबाचे पालन पोषण करणे अवघड बनले आहे. पण प्रज्ञासिंह फुकटाचे सल्ले देताहेत की दोन लग्न करा.जास्त मुल जन्माला घालावे. परंतु जे सल्ले देतात त्यांनी तर लग्न केले नाही. यापूर्वी ज्या नेत्यांनी मुल जन्माला घाला म्हणून सल्ले दिलेत त्यांची मुलं विदेशात शिक्षण घेत आहेत. जास्त मुल जन्माला घालून त्यांना गुंड मवाली बनवायचे आहेत का? चांगले शिक्षण घ्या. देशात महागाई कमी झाली पाहिजे. बेरोजगारी संपली पाहिजे. सर्वांनी गुण्यागोविंदाने नांदले पाहिजे. हे संघ व इतर नेत्यांच्या तोंडातून का निघत नाही. ही सर्व मंडळी देशाचा सत्यानाश करण्यासाठी निघाली आहे. प्रज्ञासिंह यांच्यासह इतर बेलगाम विधानं करणाऱ्या मंडळींना सद्सद्विवेक बुध्दी प्राप्त होवोत हीच प्रार्थना. अन्यथा ही मंडळी देशाचे वाटोळे केल्याशिवाय राहणार नाहीत अशी भयानक परिस्थिती निर्माण करुन ठेवली आहे.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments