Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedअर्जुन खोतकरांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, आमदारकी कायम!

अर्जुन खोतकरांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, आमदारकी कायम!

महत्वाचे….
पुढील सुनावणी मार्च २०१८ च्या पहिल्या आठवड्यात २. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आमदारकी केली होती रद्द ३. खोतकर यांच्या वतीने ख्यातनाम वकील हरीश साळवे तर कैलास गोरंट्याल यांच्या वतीने कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला.


नवी दिल्ली : शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी कायम राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने अर्जुन खोतकर यांना दिलासा देत आमदारकी रद्द करणाचा मुंबई उच्चन्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे अर्जुन खोतकर यांची आमदारकी अबाधीत राहणार आहे.

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या आमदारकीसंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी अर्जुन खोतकर यांनी उमेदवारी अर्ज निर्धारित वेळेपेक्षा उशिरा भरल्याचा विरोधात काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी खोतकर विरुध्द याचिका दाखल केली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती पी.व्ही.नलावडे यांनी अर्जुन खोतकरांची आमदारकी रद्द केली होती. तांत्रिक मुद्द्यावर न्यायालयाने आमदारकी रद्द करण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाविरोधात अर्जुन खोतकरांनी उच्चन्यायालयात धाव घेतली.

खोतकर यांच्या वतीने ख्यातनाम वकील हरीश साळवे तर कैलास गोरंट्याल यांच्या वतीने कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला होता. भारतातील दोन दिग्गज वकील ही केस लढत होते त्यामुळे सुप्रीम कोर्टात या केसबद्दल मोठी उत्सुकता होती. अखेर हरीश साळवे यांच्या युक्तिवादाने खोतकर यांना मोठा दिलासा मिळाला. आता मार्च २०१८ च्या पहिल्या आठवड्यात अर्जुन खोतकर विरूद्ध कैलास गोरंट्याल खटल्याची पुढील सुनावणी होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments