तामिळनाडू : गुरुवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास तिरुपूर जिल्ह्यात बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. अपघात येवढा भीषण होता कि यात १९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये १४ पुरुष आणि ५ महिलांचा समावेश आहे. या अपघातात सुमारे २३ जखणी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
अपघाताबद्दल मिळाल्या माहितीनुसार, तामिळनाडूमधील तिरुपूर जिल्ह्यातील अविनाशी या शहराजवळ हा अपघात झाला. अपघातग्रस्त बस बेंगळुरूहून केरळ राज्यात जात होती. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तातडीने बचाव कार्य हाती घेण्यात आले.
#UPDATE Deputy Tehsildar of Avinashi: 19 people – 14 men and 5 women, died in the collision between a Kerala State Road Transport Corporation bus & a truck near Avinashi town of Tirupur district. https://t.co/pOss4LTAtv
— ANI (@ANI) February 20, 2020