श्रीनगर – पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर गोळीबार करत शस्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानी सैन्याने पुंछ विभागातील बालाकोट परिसरात सामान्य नागरिकांना लक्ष्य करून केलेल्या गोळीबारामध्ये पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन जण जखमी झाले आहे.
पाकिस्तानच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या नागारिकांमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. पुंछ विभागातील बालाकोट परिसरात नियंत्रण रेषेपलीकडून पाकिस्तानने मोठ्या प्रमाणावर गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला आहे. या गोळीबारात पाच भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहे. जखमी नागरिकांना उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे, अशी माहिती जम्मू आणि काश्मीरचे डीजीपी एस.पी. वैद्य यांनी दिली आहे.
#WATCH: Pakistan violates ceasefire in Balakote sector. #JammuAndKashmir (earlier visuals) pic.twitter.com/02lvon6MkM
— ANI (@ANI) March 18, 2018