उत्तरप्रदेश : भीमा कोरेगाव प्रकरणामागे संघ आणि भाजपचा हात असल्याचा आरोप बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी केला.
भीमा कोरेगावमध्ये घडलेली घटना थांबवता आली असती. इथं वाद होणार यांची माहिती सरकारला होती त्यांनी तसा बंदोबस्त करायला हवा होता पण फडणवीस सरकारने जाणूनबुजून असं केलं नाही असा आरोपही मायवतींनी केला. भाजपला हा वाद चिघळू द्यायचा होता म्हणूनच त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे या हिंसाचारामध्ये भाजपचाच आणि जातीयवादी तत्त्वांचा हात आहे असा आरोपही त्यांनी केला.