Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रकीटकनाशक प्रकरण: दोषी कंपन्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा:

कीटकनाशक प्रकरण: दोषी कंपन्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा:

मुंबई: कीटकनाशक फवारणीमुळे शेतकऱ्यांच्या मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर राज्य सरकारने कीटकनाशक तयार करणाऱ्या कंपन्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. यवतमाळमधील दोषी कंपन्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन या प्रकरणात विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा झाल्याने १९ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून अनेक शेतकऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर २५ शेतकऱ्यांना अंधत्व आले आहे. यवतमाळच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी महत्त्वाची घोषणा केली. कीटकनाशक फवारणीत दोषी कंपन्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. याशिवाय १० हजार शेतकऱ्यांना प्रोटेक्शन मास्कचे वाटप केले जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याप्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments