मुंबई : कोरोनाच्या थैमानामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयानेही खबरदारीचं पाऊलं उचलले आहेत. अत्यावश्यक असेल तरच उच्च न्यायालयात या, अन्यथा कोर्टात येऊ नका, अशी नोटीस उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल यांनी काढली आहे.
करोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह नवी मुंबई,नागपूर शहरांमधील चित्रपट गृहे, व्यायामशाळा बंद करण्यात आले आहेत. तर पुणे,पिंपरी चिंचवड येथील शाळाही बंद करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या १७ वर पोहोचली आहे.