अंबाजोगाई : भाजपच्या नेत्यांना गेले काही दिवस सकाळ दुपार संध्याकाळ फक्त शरद पवार दिसतात असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. शरद पवार हे अंबाजोगाई येथे झालेल्या जाहीर सभेत बोलत होते.
राज्यकर्ते सांगत आहेत आम्ही जिंकणार चांगली गोष्ट आहे आणि जिंकण्यासाठी काही मोठ्या लोकांना घेवून आलात. काल मोदी परळी. सातारामध्ये आले होते. त्याच्याआधी गृहमंत्री आले होते. यांनी काय मांडले काहीच नाही. यांच्यापैकी कुणाचंही भाषण बघा माझं नाव घेतल्याशिवाय सुरुवातही केली नाही. जरा काही झालं की, शरद पवार जवाब दो. शरद पवार तुम्ही काय केलं. सारखं- सारखं शरद पवार, शरद पवार रात्री झोपेतही हे लोक शरद पवार यांचं नाव घेत असतील असा टोला शरद पवार यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला.
मी तर काही निवडणूक लढवत नाहीय. मी आतापर्यंत १४ निवडणूका लढल्या आहेत. त्यात ७ राज्यातील आणि ७ दिल्लीच्या आणि १४ च्या १४ निवडणूकीत एकदाही पराभव नाही. त्यामुळे १४ निवडणूका लढवून आता थांबायचं आणि नवीन पिढी पुढे आणायची असं ठरवलं. या निवडणुकीत नवीन पिढी पुढे आणत आहोत असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.