लातूर: संभाजीराव पाटील निलंगा किंवा लातुरपर्यंत मर्यादीत नाहीत. त्यांचा दबदबा नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत आहे. त्यामुळेच लातुरात रेल्वे बोगीचा कारखाना आला. हा कारखाना मला माझ्याही जिल्ह्यात आणता आला नाही. लातुरचे मुख्यमंत्री होते, केंद्रात अवजड उयोग मंत्री होते पण त्यांना हे करता आलं नाही असं प्रतिपादन भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केलं शिरुर अंनतपाळ येथील सभेत उमेदवार तथा नामदार श्री संभाजीराव पाटील निंलगेकर यांना तुम्ही निवडुन द्या त्यांना राज्यात वजनदार खाते मिळणार आहेत व संभाजीराव पुन्हादा मंञी होणार असे संभाजीराव पाटील यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना लातुरच्या पाण्याचं काम झालं नाही तर राजीनामा देण्यास तयार आहे असं पुन्हा एकदा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले.