Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईभाजपला CAA चा झारखंडमध्ये फायदा झाला नाही : संजय राऊत

भाजपला CAA चा झारखंडमध्ये फायदा झाला नाही : संजय राऊत

मुंबई : झारखंड भाजपच्या हातातून गेलं आहे. नागरिकत्व कायद्याचा (CAA) चा भाजपला काहीही फायदा झाला नाही. भाजपला आता आत्मचिंतनाची गरज आहे. असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

झारखंडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष गृहमंत्री यांनी झारखंडमध्ये पूर्ण ताकद पणाला लावली होती. झारखंडमध्ये भाजपची सत्ता होती परंतु मतदारांनी भाजपला नाकारले. जनतेला गृहीत धरु नये हाच संदेश यामधून भाजपाल मिळाला आहे. भाजपने बहुमताच्या जोरावर नागरिकत्व कायदा केला परंतु त्यांना झारखंडमध्ये त्याचा काही फायदा झाला नाही. भाजपने आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे असाही टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला.

खासदार संजय राऊत हे विधानसभा निकालापासून भाजपला डिवचण्याची एकही संधी सोडत नाही. आज झारखंडचा निकाल लागला. भाजपची सत्ता हातातून गेल्यामुळे राऊतांनी भाजपवर हल्ला चढविला. भाजप त्याला काय प्रतिउत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments