मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. अशी घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. नववी आणि अकरावीच्या परीक्षा एप्रिलमध्ये होणार आहे. परंतु दहावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळेतचं होणार असंही शिक्षणमंत्री गायकवाड यांनी पत्रकार परीक्षदेत सांगितलं.
महाराष्ट्रात कोरोनाची भीती कायम आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा ५२वर पोहोचला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही पाच महानगरांध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानं सोडून इतर सर्व दुकानं ३१मार्च पर्यंत बंद राहतील असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं.