मुंबई: काही दिवसांमध्ये सातत्याने दलित अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दलितांच्या अत्याच्याराबाबत केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले गप्प आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी केली.
सोमवारी मुंबईत काँग्रेसतर्फे करण्यात येणाऱ्या लाक्षणिक उपोषणाच्यावेळी पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी म्हटले की, रामदास आठवले केंद्रात मंत्रिपद मिळाल्यापासून दलित अत्याचाराच्या घटनांबाबत मौन बाळगून आहेत. परिणामी दलित समाजाच्या मनात त्यांच्याविषयी रोष उत्त्पन्न झाला आहे. त्यामुळे आठवलेंनी मंत्रिपदावरून पायउतार व्हावे, असे निरूपम यांनी म्हटले. आठवले याला कशाप्रकारे उत्तर देतात हेच पहाणे गरजेचे आहे.